राजकारण

खत बियाणांची कृत्रिम टंचाई करुन होणारी शेतकऱ्यांची लूट थांबव;वंचित बहुजन आघाडी ची मागणी

 

अंबाजोगाई : ऐन पेरणीच्या तोंडावर व्यापाऱ्यांकडून खत बियाण्यांची कृत्रिम टंचाई करुन शेतकऱ्यांची सर्रास लूट केली जात आहे. आणखी पेरणी सुरू झाली नाही तरी “मार्केटमध्ये खत बियाण्यांची टंचाई” हा विषय शेतकऱ्यांसाठी धक्कादायक असून अशा परिस्थितीमध्ये प्रशासन मूग गिळून गप्प का ? सर्वसामान्यांना पडणारा हा प्रश्न आहे. तसेच दुकानदारास प्रथम दर्शनी स्टॉक बोर्ड लावणे बंधन कारक असते. परंतु याची अंमलबजावणी एकही दुकानदार करत नाहीत.

व्यापाऱ्यांची मुजोरी थांबवून खतांच्या “कृत्रिम तूटवड्यातून” शेतकऱ्यांची सोडवणूक करावी. नसता संबंधित शेतकऱ्यांना सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. अशी मागणी मंगळवारी 21 जून रोजी वंचीत बहुजन आघाडी ने निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी यांच्या कडे केली आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष खाजामिया पठाण जेष्ठ नेते मारुती सरवदे ,रामराजे सरवदे, बालाजी शेळके, महादेव साखरे, वाजीत पठाण, परमेश्वर सरवदे आदी सह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »