आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग झाले पण सुरक्षा वाऱ्यावर दररोज अपघात घडत असल्याने नागरिकांकडून उपाययोजना करण्याची मागणी

 

लोकगर्जना न्यूज

बीड जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग झाले आहेत त्यामुळे दळणवळणाची साधने उपलब्ध झाली. तसेच प्रवास सुखकर झाला. परंतु राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेच्या दृष्टीने मागे दिसत असून, दररोज अपघात घडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रात्री केज-अंबाजोगाई रस्त्यावर कुंबेफळ जवळ पिकअप व टेम्पोची धडक होऊन एक ठार व एक जखमी झाल्याची घटना घडली आहे. हे नियमित घडत असलेल्या अपघाताच्या घटना पहाता संबंधित यंत्रणेने राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा पुरविण्यासंबंधि उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

मागील पाच वर्षांत बीड जिल्ह्यातील चार रस्ते राष्ट्रीय महामार्ग झाले आहेत. रस्त्याची कामे नवीन असल्याने काही ठिकाणचे गेलेले तडे व कासवगतीने सुरू असलेल्या कामाच्या ठिकणी खोदलेला रस्ता वगळता बाकी रस्ता चांगला आहे. वाहनांची गती वाढली आहे. तसे अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. दररोज या रस्त्यांवर अपघाताची मालिका सुरू आहे. गुरुवारी ( दि. २४ ) रात्री केज-अंबाजोगाई रस्त्यावर जानावरे घेऊन जाणाऱ्या पिकअप व टेम्पोची धडक झाली. यामध्ये एका वाहनाचा चालक शेख कलीम शेख खलील ( रा. बीड ) हे ठार झाले आहेत तर, एकजण गंभीर आहे. तसेच पिकअप मधील एक बैलही जागीच गतप्राण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी केजच्या सरकारी दवाखान्या समोर अपघात होऊन एकजण ठार झाला. तसेच आदि ठिकाणी नियमीत अपघात घडत आहेत. यामुळे रस्ते झाले पण सुरक्षा वाऱ्यावर असे चित्र दिसून येत असून, राष्ट्रीय महामार्ग म्हटलें की, यावर सुरक्षेची पुर्ण हामी असते. ठिकठिकाणी पब्लिक टेलिफोन बुथ असतात. तसेच रस्त्यावर दररोज धुळ साफ करण्यात येते. वळण अथवा इतर रस्त्यासंबधी सूचना फलक असतात परंतु बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्ग वगळता इतर एकही राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग अपघातास निमंत्रण देत आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी रस्ता चार पदरी असने गर्जेचा आहे परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. लातूर ते लोखंडी सावरगाव फाटा या रस्त्यावर लातूर पासून ते बीड जिल्हा हद्दी पर्यंत लातूर जिल्हा हद्दीत चार पदरी रस्ता आहे. त्यामुळे लातूर हद्दीत अपघाताचे प्रमाण ही खूप कमी आहे. मात्र बर्दापूर पासून बीड जिल्ह्याची हद्द सुरू झाली की, रस्ता तीन पदरी असून दुभाजक ही नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. हे पहाता बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग बाबतीत शासन व प्रशासन सुरक्षे संबंधि गंभीर नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »