कृषी

कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने रोपाची आवक वाढली

लोकगर्जनान्यूज

खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू असून याच काळात शेतकरी कांदा लागवडीला पसंती देतात. त्यामुळे आडस ( ता.केज ) येथील आठवडी बाजारात कांदा रोपांची आवक वाढली आहे. रोपाला दरही चांगला मिळत असल्याने कांदा रोप उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

कांदा तसा खरीप, रब्बी व उन्हाळी अशा सर्वच हंगामात घेतले जाणारे पीक आहे. परंतु खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, तूर, उडीद,मुग असे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो तसेच या पिकांचे क्षेत्र वाढते असल्याने शेतकरी कांद्याकडे काहीप्रमाणात दुर्लक्ष करतात. परंतु रब्बी हंगामात शेतकरी घरीच खाण्यासाठी म्हणून ज्वारी, गहू पेरणी व लागवड करतात. पेरणी नंतर रिकाम्या शेतात कांदा लागवडीला पसंती देतात. रब्बी हंगाम हा वातावरण स्वच्छ व थंडीचा असल्याने हा पिकांसाठी पोषक काळ मानला जातो. त्यामुळे शेतकरी काद्यांची लागवड करत असल्याने , यासाठी बियाणे ऐवजी कांदा रोपाला पसंती देतात. त्यामुळे आडस येथील शनिवारच्या आठवडी बाजारात कांदा रोपांची आवक वाढली आहे. अनेक शेतकरी रोप विक्रीसाठी आणत असून, मागील तीन बाजारा पासून शेकडो किलो रोप विकलं जात आहे. यामध्ये लाल कांद्याच्या रोपाला सर्वाधिक पसंती मिळत आहे. मागणी वाढली असल्याने कांदा रोप उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.
*लवकर वाढ अन् शंभर टक्के पीक हाती येत असल्याने रोपाला पसंती
कांद्याचे बाजारात बियाणे उपलब्ध आहे. परंतु बियाणे आणून त्याचे रोप तयार करून नंतर लागवड करावी लागते. यामध्ये काही जळून जात असल्याने तुट होते. तसेच वेळही लागतो. या तुलनेत जर कांद्याचे रोप विकत घेतलं तर वेळेची बचत होते. यात पीक जळण्याची शक्यता नाहीत जमा आहे. कांदा चांगला पोसला जातो. अशी शेतकऱ्यांचं मत आहे.
*किलोला ४० ते ३० रु. दर
सध्या बाजारात कांदा रोपांची आवक जास्त असली तरी मागणीही भरपूर आहे. त्यामुळे सध्या रोपांचा प्रति किलो ४० ते ३० रु. दर मिळत आहे. हा दर समाधान कारक असल्याची माहिती रोप विक्रेत्या शेतकऱ्याने दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »