कृषी

सोयाबीन साडेपाच ‌हजारांच्या घरात; कुठे मिळाला हा भाव

लोकगर्जनान्यूज
बीड : मागील तीन वर्षांपासून सोयाबीन साडे चार हजारांच्या पुढे सरकत नव्हता मात्र यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला असून आज रविवारी (दि.२५) सोयाबीन दर ५ हजार ५०० च्या घरात पोहचला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. मात्र या दरवाढीचा तुरळक शेतकऱ्यांना लाभ मिळताना दिसत आहे.

शासनाने सोयाबीनला ५ हजार ३२८ रुपये हमीभाव जाहीर केला असला तरी बाजार सोयाबीन सुरुवातीला ३ हजार ८०० रुपयाने विकावा लागला आहे. यानंतर यात काहीशी सुधारणा होत ४ हजार ५०० पर्यंत गेला होता. यावर स्थिर झाला होता. मात्र यावर्षी घटलेले उत्पादन आणि खाद्य तेलाचे वाढते दर आयात धोरण यासह सोया पेंड ची वाढलेली मागणी आणि दर पाहता याचा सरळ परिणाम सोयाबीन दारावर दिसत आहे. मागील काही दिवसांपासून चांगलीच दरात सुधारणा झाली आहे. आज लातूर येथील सोयाबीन प्रक्रिया उद्योग एडीएमचे दर हे ५ हजार ५४० रुपये प्रति क्विंटल झाले आहेत. म्हणजे साडेपाच हजारांच्या घरात भाव पोहोचले आहेत. ही मागणी तीन वर्षांतील सर्वाधिक दरवाढ आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पण दरवाढ झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांनी यापूर्वीच माल विकला असल्याने तुरळक शेतकऱ्यांना या दरवाढीचा फायदा मिळताना दिसत आहे. यामुळे दरवाढीचा आनंद असताना दुसरीकडे मात्र तुरळक शेतकऱ्यांना लाभ मिळत असल्याने याची नाराजी ही दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button